Tuesday, March 3, 2026

समाजरचनेच्या वेदनेतून उमललेले ज्ञानाचे सूर्य


 दि. ०३/०३/२०२६..

संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे – समाजाच्या त्रासातून घडलेले तेजस्वी कार्य

आज संत ज्ञानेश्वर महाराज चित्रपट पहिला,कितीदा जरी पहिला तरी मन भरत नाही,आणि प्रत्येकवेळेस नवीनच काहीतरी समजते,आहे वाटते आर हे आपल्याला माहीतच नव्हते,किंवा असेही आहे. तर असो, पण ह्या भावंडांकडे पहिले की आपण उगाच आपल्या समस्यांचा बाऊ करतो आणि स्वतःला स्वतःच त्रास करून घेतो असे वाटते, ह्यांनी जे भोगले त्यातले एक टक्का सुद्धा आपल्या नशिबी नाही तरी आपण सारखे देवाच्या नावाने, दुनियेच्या नावाने ओरडत असतो,कोसत असतो.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचे स्थान खूप मोठे आहे. पण त्यांचं आयुष्य पाहिलं तर ते सुरुवातीपासून सुखाच कधीच नव्हतं. उलट लहान वयातच त्यांना समाजाच्या कठोर नियमांचा आणि बहिष्काराचा सामना करावा लागला. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला म्हणून संपूर्ण कुटुंबाला समाजाने दूर केलं. त्या काळात हे असे खूप मोठा अपराध मानला जायचा.

लहान वयातच अपमान, उपेक्षा आणि संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. पण याच गोष्टींनी त्यांना खचवलं नाही, तर उलट त्यांना घडवलं. मोठे भाऊ निवृत्तीनाथ यांनी सर्व भावंडांना आध्यात्मिक आधार दिला. त्यांनीच ज्ञानेश्वरांना मार्ग दाखवला. सोपानदेव साधेपणाने भक्तीचा मार्ग जगले. मुक्ताबाई तर अत्यंत परखड आणि धाडसी होत्या. त्यांच्या वाणीमध्ये आत्मविश्वास आणि सत्याची ताकद होती. मला वाटते की त्याच ह्या तिन्ही भावंडांच्या प्रेरणास्रोत असाव्यात,नुसत्या भावंडाच्याच का तर पूर्ण समाजाच्या त्या काळातील इतर संतांच्या.चांगदेवाना दिलेले त्यांचे उपदेश आजही प्रसिद्ध आहेत.

मला नेहमी वाटतं, जर त्या काळात त्यांना इतका त्रास झाला नसता, तर कदाचित त्यांनी सामान्य माणसासाठी ज्ञान इतक्या सोप्या भाषेत दिलं नसतं. समाजाने त्यांना दूर केलं, म्हणूनच त्यांनी समाजातील प्रत्येकाला जवळ करण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या वेदनेतून करुणा आली. त्यांच्या अपमानातून समतेचा विचार जन्माला आला.

ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचे जीवन आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा, एकता आणि ज्ञान यांच्या जोरावर आपण यश मिळवू शकतो. त्यांचे जीवन महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.

आज आपणही अनेक छोट्या-मोठ्या अडचणींना सामोरे जातो. कधी नोकरीत ताण, कधी नात्यांमध्ये गैरसमज, कधी अपयश. पण त्यांचं आयुष्य पाहिलं की जाणवतं — परिस्थिती आपल्याला संपवायला येत नाही, तर ती आपल्याला घडवायला येते. फरक फक्त आपल्या विचारात असतो.

समाजाने ज्यांना नाकारलं, त्यांनीच समाजाला दिशा दिली. संघर्ष हा त्यांच्या आयुष्यात अडथळा नव्हता; तोच त्यांच्या महानतेचा पाया होता. आपणही हे लक्षात ठेवलं, तर आपल्या आयुष्यातील त्रास वेगळ्या नजरेने दिसायला लागतील. कदाचित त्यातूनच आपलं खरं घडणं सुरू होईल.

खरे की नाही,नक्की सांगा....

आशुतोष दंडगव्हाळ.

© 2026 आशुतोष दंडगव्हाळ.

या वेबसाईटवरील सर्व मजकूर, लेख व विचार लेखकाच्या परवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

8 comments:

  1. खरे आहे👌👌👍

    ReplyDelete
  2. "परिस्थिती आपल्याला संपवायला येत नाही, तर ती आपल्याला घडवायला येते. फरक फक्त आपल्या विचारात असतो" - अगदी खरंय, समर्पक वाक्य. 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण'. 'निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई' च्या गजरात वारकरी संप्रदाय रमतो तो ह्यामुळेच. संतांच्या आयुष्यातुन खूप काही शिकायला मिळतं - मात्र आपण डोळसपणे पाहिलं तरच.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर, बहिणाबाई म्हणुन गेल्यात," आधी हाताला चटके ,मग मिळते भाकर".

      Delete
  3. Khare aahe. Dikhawati satyapeksha aayushyache khare satya umajane he garjeche aahe. Chhan lekh👌

    ReplyDelete
  4. शिवाजी काकडेMarch 4, 2026 at 10:11 PM

    महाराष्ट्र हि महान संतांची भूमी असून इथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर,संत एकनाथ असे अनेक थोर महापुरुष झाले. सर्वांना अतोनात हाल आणि विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागले. सर्वां कडून एक चांगली शिकवण मिळते ती म्हणजे आपण परिस्थितीला दोष न देता आपले सत्कर्म करत राहणे.ना मोह ना मत्सर. आजच्या युगात आपण अनेक अपेक्षांच्या ओझ्यामुळे दबून गेलो आहे. आपण सत्कर्म करून ईश्वराला अनन्य भावाने शरण जाणे हेच काय ते मर्म.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर, आपण आपले काम करत राहणे, देव आहेच बघायला आणि सांभाळायला.

      Delete

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...