Tuesday, March 20, 2018

" नात्यान पलीकडची नाती "

नात्यान पलीकडची नाती.....

भारतीय माणूस नेहमी आपल्या नातेवाईकांमध्ये रमणारा,सगळ्यांना अभिमानाने सांगेल आमचे येवढे नातेवाईक आहेत,असे तसे. पण ज्या वेळेस आपण कामानिमित्त कुठेतरी दूर जातो त्यावेळेस त्या नवीन जागेत जी नाती निर्माण होतात ती खूप वेगळी असतात,त्या नात्यांना नाव कुठलेच नसते,पण ती तरीही खूप घट्ट आणि हवीहवीशी वाटणारी असतात, त्या अनोळखी प्रदेशात खंबीर पाठिंबा देणारी असतात, खऱ्या नात्यांपेक्षाही मोठी होऊन जातात.आणि हो ह्या नात्यांचे एक असते ही नाती जातपात, लहानमोठे,गरीब श्रीमंत,असले काही बघत नाही,अठरापगड जातींचे लोक ह्यात एकत्र येतात एक नवा समाज तयार होतो,हो गरजेपोटी पाहिले एकत्र येतात पण त्यातून अशी नाती निर्माण होतात की मग गरज तिथे दुय्यम होऊन जाते.
वडील शासकीय खात्यात,त्यामुळे आमचे घर म्हणजे विंचवाच्या पाठीवरचे बिऱ्हाड, आज ह्या गावात तर उद्या त्या गावात, कधी ऐके ठिकाणी 2-3 वर्ष सलग राहिलेलो आठवत नाही. नोकरीच्या जागा पण अश्या, किनवट, परभणी,नांदेड, अजून कुठली कुठली खेडी. सगळे नातेवाईक औरंगाबाद,पुण्यात आणि आम्ही दूर दुसऱ्या टोकाला. त्यावेळेस आजच्या सारखे गाड्यांची सोय नव्हती येण्याजाण्यासाठी, क्वचित एखादी एस टी असायची,त्यामुळे सहसा नातेवाईकांची भेट वर्षातून एकदा कीवा कधी दोन वर्षांतून एकदा, पण मग जिथे राहायचो तिथेच आजुबाजूला ही अशी पल्याडली नाती निर्माण झाली कधी झाली कशी झाली ते नाही कळाले,पण मग आजोबा ,आजी,मामा, बहीण भाऊ किती तरी,काही अशी ज्याला नावसुद्धा नव्हते.
किनवट च्या आम्मा( खोजा जातीतील ह्या धिप्पाड, नजरेत जरब असणाऱ्या ) , माझ्या आईला त्या मुलगी मानायच्या, मुलीप्रमाणे त्यांनी तिला सांभाळले, तिथलेच खान डॉक्टर,. परभणीचे सरदेशपांडे काका काकू,त्यांची मुले, लहानपणी मी सकाळी उठलो की त्यांच्या घरी माझे बाकीचा दिवस जायचा,असे आई सांगायची,तिथलेच दाभाडे कुटुंब, असे कितीतरी , ती नावे न संपणारी.
मला जास्त आठवते  ते देगलुर (त्यातल्या त्यात ह्या गावात जरा 4-5 वर्षे सलग काढली आणि थोडा मोठा झालो होतो म्हणून  इथले सगळे आठवते ). पपांच्या ऑफिस मध्ये एक सोनिकाका शिपाई म्हणून होते, आम्ही दोघे भावंडं ह्या माणसाकडे च जास्त असायचो, अगदी आजोबांपासून मित्रा पर्यंतचे सगळी नाती त्यांच्यात एकवटली होती, खांद्यावर बसून फिरवणारे सोनीकाका, गणपतीत अामचेकडून डान्स बसऊन घेणारे डायरेक्टर,अजून काय काय, टेलर काका ते व त्यांचे कुटुंब, कुठला तरी सण होता, आईला तिच्या माहेरची खूप आठवण येत होती म्हणून ती रडत होती त्याच वेळेस टेलर काका घरी आले होते ,तिला तसे रडताना पाहून त्यांचे डोळ्यात पाणी आले,ते तिला म्हणाले पोरी आजपासून माझे घर म्हणजे तुझे माहेर,परत असे सणाला रडायचे नाही,त्यादिवसापासून आईला एक माहेर मिळाले. . तिथेच मुलासारखे प्रेम करणारे गायकवाड काका आणि तबला शिकवताना एकदम कडक गुरु,दोन्ही कसे जमायचे त्यांना ते समजायचे नाही, शिकवताना पोराला मारले म्हणून नंतर स्वतःच रडायचा हो हा माणूस.
असंच एक कुटुंब ज्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ आला,आज जो काही मी आहे, जे काही मी मिळवले ते कापसे पती,पत्नि मुळे,त्यांनी मला ऐकु येत नसताना,कानाचा आजार माहीत असताना मला नोकरी दिली ,आणि माझेवर जो विश्वास दाखवला तो दुसरे कोणी करू शकले नसते, माझ्या आजारपणात ह्या दोघांनी जी काही मदत केली ती विसरणे कदापि शक्य होणार नाही, काय नाते होते त्यांच्याशी माझे बॉस होते माझे ते,पण परत इथे तेच अदृष
 नाते काम करून गेले.
औरंगाबादचे घाटगे काका काकू , विजन अंकल ( माझे पुण्यात कॅन्सर चे ऑपरेशन झाले होते,त्यावेळी त्यांची स्वतःची तब्बेत बरी नसताना आजोबांच्या वयाचा हा माणूस,25 km वरून मला हॉस्पिटल मध्ये बघायला आले होते. आणि हो स आम्ही जिथे राहतो तिथे मला एक गोड बहीण आणि पंत मिळालेत,काकडे पती पत्नी.

ही अशी माणसे आणि अजून कितीतरी, लिहायला जागा अपुरी पडेल,  ती माणसे ती नाती आयुष्यातून कधीच काढून टाकू शकत नाही कीवा विसरुपण शकत नाही....

आशुतोष दंडगव्हाळ.....

7 comments:

  1. Khupch chhan blog gadi manal chatun gela .Kharch kami loka astat ashi dole bharun ale .👌👌

    ReplyDelete
  2. हृदयस्पर्शी

    ReplyDelete
  3. खूपच छान. खरंच ही माणसंच आपुलकी म्हणजे काय ते समजावतात आपल्याला

    ReplyDelete
  4. Ashi jodlya geleli nati barech kahi deun jatat.Changli mandani!!

    ReplyDelete

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...