Sunday, January 25, 2026

" चूक की बरोबर.."?

दि. २५/०१/२६..
चूक की बरोबर?

प्रत्येक गोष्टीत चूक-बरोबर शोधणे कितपत योग्य आहे?
आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत—
“हे बरोबर आहे” किंवा “हे चूक आहे”.
शाळेतील उत्तरपत्रिका असो, समाजातील वागणूक असो किंवा 
नात्यांमधील अपेक्षा, सगळीकडे चूक आणि बरोबर या दोन चौकटी तयार केलेल्या आहेत.
पण प्रश्न असा आहे की, प्रत्येक गोष्टीत चूक आणि बरोबर शोधणे खरंच योग्य आहे का?
चूक-बरोबर ही संकल्पना कुठून येते?
चूक आणि बरोबर ही संकल्पना माणसाने स्वतःच्या सोयीसाठी तयार केली.
कायदा, नियम, शिस्त यासाठी ती आवश्यकही आहे.
पण आयुष्य फक्त नियमांवर चालत का हो, ते भावनांवर, परिस्थितींवर आणि अनुभवांवर चालतं.
जे आज आपल्याला बरोबर वाटतं, ते उद्या चूक ठरू शकतं.
आणि जे आज चूक वाटतं, तेच कधी आयुष्याचा मोठा धडा बनू शकतं.
प्रत्येक गोष्ट काळी-पांढरी नसते ना,आपण ना अनेकदा गोष्टींना दोनच रंग देतो
चूक किंवा बरोबर.पण आयुष्याच्या चित्रात करड्या छटाही असतातच की.
एखाद्याचा निर्णय त्याच्या परिस्थितीतून आलेला असतो. आपल्याला तो चुकीचा वाटू शकतो.
पण त्या व्यक्तीसाठी तोच एकमेव बरोबर मार्ग असू शकतो ना किंवा असेल.
आता हेच बघा ना,आपण नात्यांमध्ये सतत चूक-बरोबर मोजायला लागलो,
तर संवाद कमी होतो , आणि अपेक्षा वाढतात.
कधी “मीच बरोबर” सिद्ध करण्याच्या नादात
आपण माणूस समजून घेणं विसरतो.
नातं जिंकण्यापेक्षा ,वाद जिंकणं महत्त्वाचं वाटू लागतं, आणि तिथेच नातं हरवतं. मग योग्य काय?
योग्य हे नाही की चूक-बरोबर पूर्णपणे नाकारावं.
पण योग्य हे आहे की,प्रत्येक गोष्टीकडे समजून पाहावं
प्रत्येक व्यक्तीला तिच्या दृष्टीकोनातून ऐकावं
आणि प्रत्येक परिस्थितीत लवचिकता ठेवावी
कधी बरोबर असणं महत्त्वाचं नसतं,
तर समजूतदार असणं जास्त महत्त्वाचं असतं.
एकूण काय तर , आयुष्य म्हणजे
फक्त चूक आणि बरोबर यांची यादी नाही.
ते अनुभवांची, शिकण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया आहे.
कधी चूक आपल्याला घडवते, तर कधी बरोबर आपल्याला थांबवते.
म्हणूनच प्रश्न असा नाही की
“हे चूक की बरोबर?”
तर प्रश्न असा असायला हवा की—
“हे मला काय शिकवतं?”
काय वाटते तुम्हाला??? नक्की सांगा..

© 2026 | लेखनाधिकार : आशुतोष दंडगव्हाळ
विचार मांडणी ही वैयक्तिक असून अनधिकृत वापरास मनाई आहे.

Thursday, January 22, 2026

"आयुष्य : प्रश्नांची अखंड यात्रा"

दि.२२/०१/२६..

( आशुतोष दंडगव्हाळ..)

आयुष्य : प्रश्नांची अखंड यात्रा...

जर आपण आयुष्याची व्याख्या तयार करायची

म्हटले तर किती तयार होतील,

अगदी जेवढी लोक आहेत तेवढ्या, 

 त्या प्रत्येकाची एक व्याख्या असेल,

आणि सगळ्याच बरोबर असतील,हो की नाही? 

माझी पण एक व्याख्या मी तयार केलीय,बघा बरोबर वाटते का...

आयुष्य म्हणजे सरळ रेषेत चालणारा प्रवास नाही.

तो वळणावळणाचा आहे.

कधी उजेडातला, तर कधी अंधारातला,

आणि प्रत्येक वळणावर उभा असतो — एक प्रश्न.

माझ्या मते आयुष्य म्हणजे

प्रश्न सोडवत पुढे जाण्याची शांत पण कठीण यात्रा.

आयुष्य आपल्याला कधीच थेट उत्तर देत नाही.

ते फक्त प्रश्न विचारत राहतं.

कधी परिस्थिती बनून,

कधी माणसं बनून,

तर कधी आपल्या आतल्या आवाजाच्या रूपात.

लहानपणी प्रश्न साधे वाटतात.

मी काय होणार?

मला काय आवडतं?

पण काळ जसजसा पुढे सरकतो,

प्रश्नांचं वजन वाढत जातं.

जबाबदाऱ्या कशा पेलायच्या?

स्वप्नं जपायची की वास्तव स्वीकारायचं?

मी जे जगतोय, ते खरंच माझं आयुष्य आहे का?

या प्रश्नांची उत्तरं कुठल्याही पुस्तकाच्या शेवटच्या पानावर नसतात.

ती वेळ देऊन उलगडतात.

कधी अपयश आपल्याला उत्तर शिकवतं,

कधी यश आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतं.

काही प्रश्न लगेच सुटतात,

काही प्रश्न आपली झोप उडवतात,

आणि काही प्रश्न असे असतात

जे उत्तर न देता देखील

आपल्याला माणूस बनवत राहतात.

खरं तर आयुष्याचं सौंदर्य उत्तरांत नाही,

ते शोधात आहे.

प्रश्न विचारण्यात आहे.

स्वतःशी प्रामाणिक राहण्यात आहे.

प्रश्न संपले, तर आयुष्य संपेल.

कारण प्रश्नच आपल्याला चालायला भाग पाडतात,

विचार करायला शिकवतात,

आणि आतून हळूहळू घडवत राहतात.

म्हणूनच आयुष्य म्हणजे

उत्तरांचा शेवट नाही,

तर प्रश्नांसोबत जगण्याची कला आहे.

आणि कदाचित,

आपण शोधलेली उत्तरं नव्हे,

तर त्या शोधात बनलेली आपली व्यक्ती

हेच आयुष्याचं खरं फलित आहे.

Sunday, January 4, 2026

"The Intern" - Experience Never gets Old..


 Date: 03.01.2026

In the new year, I’m writing my first blog. Honestly, a lot of topics come to my mind, and by the time I think “I should write, I should write,” they fade away. But today, after watching this movie, I felt that I must write today itself.

With different taglines like “Experience never gets old, Experience never goes out of fashion,” the 2015 film “The Intern” was watched again today. This is one of my favorite movies. Its taglines themselves say a lot, but this movie still teaches much more beyond that.

There’s something special about this film. While watching it, you constantly feel that all this is happening around us. We meet these kinds of characters every day in our lives.

Actually, the tagline is absolutely true, but one more thing is strongly highlighted here — the old values about how to live a good life are still relevant today. In fact, they never become outdated. With changing times, only their form changes. The values by which our previous generation, and generations before them, lived a healthy and happy life are the same values that apply even today. If we try to live by abandoning them, life becomes complicated, or such problems arise that while trying to solve them, even bigger problems are created. At the same time, these old values solve those problems instantly and make life straight, simple, and easy.

The point of saying all this is that today we are blindly imitating Western culture. Small families, a world limited to just “us and our family,” and in the name of freedom, giving unrealistic space to each other — in this process, we have distanced ourselves from one another. Open conversations have stopped, sharing has stopped. There is no one left to give reassurance, no one to say “I am here.” Opening up one’s heart has almost stopped. This situation has taken a very serious form in Western countries, and this movie shows that clearly. And the character of Robert is shown handling that situation using those very old values.

We are still fortunate that guiding elders are still with us, and we have already inherited something from them. But it is necessary to absorb those values even more deeply and pass them on to the next generation, so that they too can live a better life.

Everyone should definitely watch this movie. What you understand while watching it cannot be explained by someone else. There are so many small things in life, but if they are not nurtured, they turn into serious problems later. Whether it is husband–wife relationships, friendships, office life — for so many issues, this movie shows simple answers through old values.

Problems that arise in work, relationships, and friendships are actually created by us. We complicate them, and then while trying to solve them, we exhaust ourselves. At such times, these old values are what truly help in solving those problems.

They don’t say “old is gold” for no reason. To give a very simple example — even today’s Gen-Z youth love Kishore Kumar’s old songs. Lata Mangeshkar and Mohammed Rafi are on their playlists too. Isn’t that interesting?

Do watch this movie at least once — both the old and the new generations together. Especially today’s younger generation should definitely watch it.

After watching the movie, which thought or value did it remind you of? Do comment and let me know… I’m waiting.

I have intentionally not written too much here, because the joy of watching the movie, experiencing it, and understanding it cannot come from reading.

Do watch it and tell me.

Ashutosh Dandgaval

" The Intern " - Experience Never gets Old...

दि. ०३.०१.२०२६.. 


नविन वर्षात ला पहिला ब्लॉग लिहितोय,खरे तर खूप विषय डोक्यात येतात आणि लिहू - लिहू म्हणेपर्यंत विरून पण जातात, पण आज हा चित्रपट पाहिल्यावर म्हटले आज लिहायचेच.

Experience never gets old, Experience never out of fashion, अश्या वेगवेगळ्या tagline ने प्रदर्शित झालेला २०१५ cha "The Intern" आज परत बघण्यात आला, हा माझा आवडत्या चित्रपटांपैकी एक चित्रपट, त्याच्या tagline च सगळं काही सांगून जातात,पण हा चित्रपट अजून हि बरेच काही शिकऊन जातो...

ह्या चित्रपटाची एक गंमत आहे, हा बघतांना असेच सारखे वाटते की हे सगळे आपल्या अवतीभवती चालले आहे, ह्या सगळ्या पात्रांना आपण रोज भेटतोय...

खरे तरी tagline वापरली आहे ते तर आहेच पण अजून एक गोष्ट ह्यात अधोरेखित होते ती की जी जुनी मूल्ये आहेत चांगले आयुष्य कसे जगावे ती आजही लागू होतात,ती खरेतर कधी जुनी होतच नाही, नव्या युगाप्रमाणे त्याचे स्वरूप फक्त बदलते. आपल्या अगोदरची पिढी,त्यांचे अगोदरची पिढी ज्या काही मूल्यांनी स्वस्थ आणि आनंदी आयुष्य जगत होते,तीच मूल्ये आजही लागू होतात,आणि ती सोडून जगायचे म्हटले तर आयुष्य complicated होते किंवा असे प्रश्न निर्माण होतात की ते सोडवायला गेले की अजून मोठे प्रश्न तयार होतात, आणि त्याच वेळेस ही जुनी मूल्ये ती सगळी प्रश्न झटक्यात सोडवतात आणि आयुष्यं सरळ साधं सोपं बनवून टाकतात.

हे सांगायचे ह्यासाठी, की आपण आज पाश्चात्य जगाचे अनुकरण करतोय अगदी कुठलाही विचार न करता, छोटे कुटुंब, आपण आणि फक्त आपले कुटुंब एवढेच जग, स्वातंत्र्या च्या नावाखाली , एकमेकांना अवास्तव स्पेस देण्याच्या  नादात एकमेकांपासून दुरावलो, एकमेकांशी मोकळे बोलणे बंद झाले,शेअर होणे बंद झाले, कोणी धीर देणारे, मी आहे म्हणणारे उरले नाही, मन मोकळे करणेच बंद झाले, ही परिस्थिती पाश्चात्य देशात कितीतरी गंभीर स्वरूप बनून राहिलेय ही ह्या चित्रपटात दाखवलंय,आणि ती परिस्थिती सावरणारा रॉबर्ट तीच जुनी मूल्ये वापरताना दाखवलाय...

आपले नशिब अजूनही चांगले आहे आपल्याला साकारणारे मोठी माणसे आजही आपल्या बरोबर आहेत, त्यांचेकडून आपण काही वारसा घेतलेलाच आहे,पण ते अजून जास्त आत्मसात करून पुढच्या पिढीला देणे गरजेचे आहे, जेणेकरून तीही पिढी उत्तम आयुष्य जगू शकेल. 

हा चित्रपट आवर्जून सगळ्यांनी पहावा, तुम्ही बघताना जेवढा तो कळेल तेवढे कोणी सांगून समजणार नाही, आयुष्यात किती छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या जपल्या नाही तर त्याच पुढे गंभीर प्रश्न बनून पुढे येतात, नवरा - बायको, मित्र - मैत्रिण, ऑफिस, अशा कितीतरी विषयातल्या प्रश्नांवर सोपे उत्तरे देणारी जुनी मूल्ये ह्या चित्रपटात दाखवली आहेत...

काम, नातेगोते, मित्रत्व ह्यात निर्माण होणारे प्रश्न खरेतर आपणच उभे करतो,complicated करतो, आणि मग ती सोडवताना आपलीच दमछाक होते,त्यावेळेस ते प्रश्न सोडवायला ही जुनी मूल्यं च कामाला येतात...

जुने ते सोने उगाच म्हणत नाहीत, अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर, आजच्या gen-z तरुणाईला ही किशोरदा ची जुनी गाणी आवडतात.. लता - रफी त्यांच्याही तोंडावर असतात , आहे की नाही गंमत..

नक्की एकदा पहाच हा चित्रपट, जुन्या व नव्या पिढीनी दोघांनीही, खासकरून आजच्या तरुण पिढीने तर नक्की पहावा..

चित्रपट बघून तुम्हाला कुठली गोष्ट,मूल्ये आठवली ती नक्की कमेंट करून सांगा... वाट पाहतोय..

इथे मुद्दामच जास्त काही लिहिले नाही, कारण तो चित्रपट पाहून अनुभव घेऊन समजून घेण्यात जी मजा आहे ती वाचून नाही जमणार...

नक्की पाहा आणि सांगा..

आशुतोष दंडगव्हाळ...






" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...