Sunday, April 8, 2018

" पिढी - जुनी / नवीन "

दि. ८-४-२०१८.

पिढी - जुनी / नवीन....

आमच्या वेळेस असे नव्हते बाई, नाहीतर आमच्यावेळी असे नव्हते बुवा. आजची पिढी मजा करतीय नुसती. हे वाक्य आपल्या पैकी प्रत्येकाने ऐकली असतील,आपल्या घरातील थोरामोठ्याकडून ,
हो की नाही?

आजोबाआजी त्यांच्या मुलां,सूनानबद्दल, आईवडील त्यांच्या मुलांसूना बद्दल,आपण आपल्या मुलांबद्दल हे असेच चालत राहणार,न थांबणारी साखळी आहे ही.

सगळ्यांनाच वाटते आपल्या पुढची पिढी ला जास्त सुखसोयी, आराम,चांगले आयुष्य मिळते मागच्या पेक्षा. काहिबाबतीत खरे पण असेल काही बाबतीत. पण खरेच सांगा असे आहे का नक्की ?

मला विचारलं तर मी  म्हणेन की आपल्या अगोदरची पिढी सुखी होती.

प्रत्येक पिढीत काही चांगल्या काही वाईट गोष्टी होत्या,काही फायदे काही तोटे होते, पण खरेच सांगायचे तर,विचार केला तर आपल्या मागच्या पिढीत तोटे कमी, फायदे जास्त होते असेच प्रत्येक पिढीला अनुभव येईल,हेच आणि हेच सत्य अनुभवायला मिळते. हो आता कोणी ह्या मझ्या मताशी सहमत असेल कोणी नाही, पण स्वतःच्या मनाला विचारलं तर ते ह्याचे  उत्तर नक्कीच मी जे म्हणतो तसेच आणि तेच असेल ह्याची खात्री आहे मला.

तुम्ही म्हणाल काय हा माणूस,आज प्रगत विज्ञान, दवाखाने, रस्ते, सुखसुविधा आहेत, मागच्या पिढीला असे काही नव्हते,हो पण हे सगळे असले तरी त्याबरोबर येणारी गर्दी,ट्रॅफिक,वेळ,चांगले खायला मिळणे, शांतता,निसर्ग, सुखशांती बरेच काही आज आपल्याकडे नाहीये.

अगदी छोटेसे उदाहरण घ्या,आपल्या पिढीला जे आजोळसुख मिळालेय ते आपल्या मुलांना मिळतेय का,ते आजोबा-मामाच्या घरी केलेली मस्ती,सुट्ट्या कधी लागतायेत असे व्हायचे,ती 2-2 महिने केलेली धमाल आठऊन बघा ,ती आजकालच्या मुलांना मिलतिये का?
त्याही अगोदरच्या पिढीत जाल तर अजून एक गोष्ट जाणवेल ती ही,नोकरी-कामासाठी,शिक्षणासाठी कुठे बाहेरगावी जावे लागले तर लगेच अमक्याचा तमका कोणीतरी त्या गावी आहे,त्याचे भरोषावर माणसे जायची आणि तो तिथला माणूस पण स्वतःचे कोणी माणूस असल्यासारखे आदरातिथ्य पार पडायचा,हे सुख आज तुमच्या आमच्या वाटेला नाही. अश्या बऱ्याच गोष्टी पिढ्यानपिढ्या सुटत गेल्या,मिळणे दुरापास्त झाल्या.

हो आज आपण खूप काही पुढे गेलो असू,पण मागे जे सुटले ते परत मिळू शकेल का आपल्याला...

एकूण हेच की, प्रत्येक पिढीला हेच वाटणार,आणि खरेच आहे ते की आपल्या अगोदरची  पिढी ही आपल्यापेक्षा सुखी होती.

आशुतोष दंडगव्हाळ...

6 comments:

  1. Khupach khare agdi barobar-Nirmala {Aai}

    ReplyDelete
  2. Barobar ahe.atachya pidhila Suvidha baryach ,parantu ti maja nahi nisargachi, ektra yenyachi.

    ReplyDelete
  3. Yes we enjoyed a lot
    But today's generation is also enjoying in their own way
    Just a small generation gap☺

    ReplyDelete
    Replies
    1. No-no this is not like that they did not njyed,but not more than us,our Genegenera not more than our previous generation.

      Delete

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...